उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका 'ही' 5 फळं; नाहीतर होईल पोटात आग

उन्हाळ्यात ही पाच फळ खाऊ नयेत. जाणून घेऊया उन्हाळ्यात ही फळ खाण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम. 

| May 14, 2024, 21:55 PM IST

Fruits Avoid In Summer : शरीर निरोगी अणि सृदृढ ठेवायचे असेल तर आहारात फळांचा सामावेश केला पाहिजे. विविध प्रकारच्या फळांमधून शरीराला मोठ्या प्रमाणाच पोषणतत्वे मिळतात. मात्र, अशी काही फळ आहेत ज्याचे उन्हाळ्यात सेवन करने आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

1/7

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवसत्व असतात. यामुळे फळांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, अशी काही फळं आहेत जी खाल्ल्यामुळे उन्हाळ्यात त्रास होऊ शकतो. 

2/7

खजूर

खजूर हे सर्वात शक्तीवर्धक फळ मानले जाते. मात्र, उन्हाळ्यात खजूराचते सेवन शरीरासाठी हानीकारक ठरु शकते.   

3/7

लिची

लिची हे रसाळ फळ आहे. मात्र, उन्हाळ्यात लिचीचे सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होऊन पोटात आग पडल्यासारखे होऊ शकते. 

4/7

चिकू

अनेकांना चिकू खायला आवडतात. मात्र, उन्हाळ्यात चिकी खाल्ल्यास पोट बिघडू शकते.   

5/7

आंबा

आंबा हे सिजलन फळ आहे. उन्ह्याळ्यातच आंब्याचा हंगाम असतो. मात्र, जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

6/7

पपई

पपई हे फळ थंडीत खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते. मात्र, पपई उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊ शकते.   

7/7

अनेक फळं ही सर्व ऋतुंमध्ये उलपब्ध असतात. मात्र, अशी काही फळे आहेत ज्यांचे उन्हाळ्यात सेव केल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.